Monday, May 30, 2011

वरदा चंडिका प्रसनोत्सव

बापुराया काय वर्णावा तो ‘वरदा चंडिका प्रसनोत्सव ! फक्त सद्गुरुंचे अधिष्ठान असलेला, भक्ति आणि वात्सल्याने रसरसलेला उत्सव होता. सर्वकाही अफाट होत.

वैभव आणि ऐश्वर्याने नटलेल्या सभामंडपातील प्रत्येक इवेंट सीमांत होता.
ज्या वेळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 7/5/११ रोजी बापुरायाने प्रतिष्ठापना केलेल्या मोठी आई महिषासुरमर्दिनी, महाकालिमाता आणि महासरस्वतीमाता, ह्या देवता सर्वाना दर्शनासाठी खुल्या केल्या त्या वेळचे प्रथम दर्शन अतिशय रम्य ,मनोहारी, अवर्णनीय आणि ह्रुदयस्पर्शी होत.

नंतर रविवार दिनांक 8.5.11 ह्या दिवशी सर्व इवेंट पाहता पाहता सहजपणे मला
“मेरा नाम जोकर ” ह्या हिंदी सिनेमामधील गाण्याच्या पुढील ओळी आठवल्या

ये भाय जरा देखके चलो !
आगे भी नहीं पिच्छे भी !
दाए भी नहीं बाए भी !
उप्पर भी नहीं निचे भी …..

कारण, सर्वत्र ऑडियो, विडियो बापुरायच दिसत होते, ऐकायला येत होते, त्यांच्या मंत्रघोषनीच सर्वत्र पूजन सुरु होते. तसेच संस्कृत मधील मातृवात्साल्याविन्दानाम ह्या ग्रंथाचे पठनही चालू होते “दुर्गा वरदा होम येथे, इति बापुराय आणि आम्हा सर्वानबरोबरही ह्या सोहोल्यामध्ये होते दादा, बापू, नंदाई.

सर्वत्र भक्तिमय वातावरणात भक्तिच्याच ९ पायरयांवरून चालत दर्शन होत होते. अशा प्रकारे ११ दिवसांच्या उत्सवातील पहिला दिवस - एक नवचैतन्याने भरलेला जीवनपट पुढे सरकत होता. नवलाई होती तर्सेच नाविन्यहि होते पण उत्सवातील प्रत्येक गोष्ट बापूंनी आम्हा भक्ताना उत्सवापुर्वी 9-10 महीने आधी सांगितलेली होती. त्यामुळे नवलाई खुपच होती.

जिथे आपलेपण असते तिथे जिव्हाळा असतो आणि हेच आमचे दैवत (गुरुमाउली)
तिथेच फक्त सत्चिदानंद लाभतो तो सर्व ह्या उत्सवामध्ये भरभरून आम्ही अनुभवला.

छोटीशी मार्गदर्शिका होती उत्सवाची जी आम्हाला उत्सवापुर्विच मिलाली होती. तसेच तंतोतंत सर्व इवेंट उभे केलेले होते .
एवढा अफाट उत्सव, त्याची मांडणी, त्यासाठी लागणारे प्लानिंग, मनुश्यबल, कारागीर, कलाकार, हे सर्व तैयार होउन त्या देवतानमध्ये जीवंतपणा ओतणे हे फक्त
आमचे बापुरायच करू जाणे. शिवाय, उत्सवासाठी देणग्या गोळा करणे नाही, उत्सवाला प्रसिध्ही देण नाही, प्रसार नाही प्रचार नाही,कोणतेही माध्यम नाही फक्त सद्गुरु वचन पालणे, असाहा जगावेगला चिरस्मरणीय, चिरस्थायी उत्सव, भरभरून आनंद देऊन गेला. || एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा ||
सद्गुरु वचन आहे. त्यामुळे सर्व इवेंट जसे सांगितले आह़ेत तसे करायचे मग शंका कुशंका मनात आल्याच नाहीत.

|| देवाचिया द्वारी उभा क्षणभरी ||
पण आम्ही दहाही दिवस सद्गुरुसमवेत सत्च्चिदानंद लुटला. सत्संग झाला.
भक्ति आणि सेवानी देवालय गजबजून गेले होते .
फक्त देवाकडे जाउन नमस्कार करून परत येण नाही तर जे काही मनापासून करणार, उत्सवामध्ये सहभागी होणार त्याला प्रत्येकाला 100% लाभ मिळणांरच. अशी बापुन्ची ग्वाही आहे.

संपूर्ण उत्सवभर नियमित पुढीलप्रमाणे इवेंट आणि मंत्र पठण चालू होते :


1. पुढीलप्रमाणे जप दिवसभर चालू होता :

ओम ऐं रहम क्लीं चामुंडायै विच्चे |
नतेभ्य: सर्वदा भक्त्या चंडिके दुरीतापहे |
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विशौ जहि ||
ओम नम: चंडिकायै ||

2. त्यानंतर महाआरती दुपारी एक वाजता आणि रात्री नौ वाजता होत असे. आणि बापू नंदाई आणि दादा स्वत: करीत असत. तसेच महानैवेद्य आणि महाभोग दररोज सकाळ संध्याकाळ लेझीमच्या नादात आणि ढोलकीच्या तालात होत असे.
श्रद्धावानाना सामर्थ्य मिळावे म्हणून ह्या उत्सवात काही पुजनांचे आयोजन केले होते :

3. महाकाली कुड : ह्या कुंडआमध्ये भक्तांना असुर दहन द्रव्य अर्पण करता येत कारण त्या मुले कलीयुगातील मानवाच्या प्राणमय देहात असणारी त्या भयंकर कलीकेंद्रना क्षीण करण्यासाठी हे महाकली कुद आहे.
4. महलक्ष्मि दीप : कली युगात मानवाच्या शक्तीकेंद्रापैकी जी केंद्रे उदासीन झाली आहेत त्या शक्ती केंद्राना पुन्हा सशक्त आणि सक्रीय बनविण्यासाठी येथे सुरस्नेहन द्रव्य अर्पण करायचे होते.
5. महासरस्वती वापी : शुभंकर केंद्रे सक्षम हो ण्या साठी ह्या वापी म्हणजे विहिरीमध्ये मांगल्य द्रव्य की जी तेथेच उपलब्ध होती, ती अर्पण करावयाची होती.

6. महिषासुरमदिनीचा चौथा अवतार रक्तदनतीकेच्या शत्रुघ्नेश्वरी रूपाचे पूजन : हिचे स्वरूप अत्तिशय ऊग्र असले तरी श्रद्धावानांना ते अतिशय प्रेमळ आहे. म्हणून ते आपल्याला बघायचे आहे व तिचे पूजन करावयाचे होते.

७ सहस्त्रचंडी याग : हा याग देविसप्तशती ग्रंथानुसार सप्तशतीपाठ चे १० दिवस पठण-यजन व हे सर्व १०८ विशेष प्रशिक्षित पुरोहितांनी संपन्न केले.


८. श्रीदुर्गावरद होम : सदगुरु श्री अनिरुद्धांनी स्वत: संस्कृतमध्ये लिहिलेल्या मातृवात्सल्यविन्दानम अर्थात मातरीश्वर्यवेद: ह्या ग्रंथाचे वाचन करून ह्या यज्ञात हवन केले.

९. जान्हवीस्थानम येथे गंगामातेची स्थापना : ज्या दिवशी गंगा भागीरथी बनून पृथ्वीवर अवतरली तो दिवस म्हणजे १० मे आहे. बरोबर तोच दिवस म्हणजे १० मे २०११ रोजी ह्या उत्सवात ह्या ठीकाणी श्रीगंगेची स्थापना बापुरायाने केली. खरोखरीच गंगा पृथ्वीतलावर त्या दिवशी अवतरली..
सप्तसमुद्रांचे आणि संपूर्ण जगभरातून वाहनार्या शतनद्याचे हे जल (ह्या संस्था च्या कार्यकर्ते आणि भक्तांनी अतिशय परिश्रम करून) गंगामातेच्या अभिषेक साठी आणले होते. ह्या अभिषेकजलाला नाव आहे – ‘मुर्धाजलम’.

तसेच ह्या ठिकाणी शनिवार दिनांक १४ मे रोजी रात्री गौरी गंगेचा मिलाप आणि शिव गंगा गौरीचा अवतरण सोहोळाही बापुरायाने संपन्न केला.

एकूण ११ दिवस चालू असलेला हा चिरस्मरणीय सोहोळा मंगळवार दिनांक १७ मे ११ रोजी आपल्या आवडत्या गजर – जयंती मंगला काली | भद्रकाली कपालिनी ||
दुर्गा क्षमा शिवा धात्री | स्वाहा स्वधा नमोस्तुते ||
गजराने ह्या समारंभाची सांगता न होता हा उत्सव संपन्न झाला.

||हरिओम||

Wednesday, March 11, 2009

कोल्हापुर मेडिकल कैंप २००९

ह​रि ॐ
ह्या वर्षी मेडिकल कँप कोल्हापूर जील्हयातील व शाहूवाडी येथील पेंडाखळे हया गावी सम्पन्न झाला. गेली पाच वर्षे हया गावातच सदर कँप होत आहे. हा कँप एकंदर दोन दिवसांचा होता -- 9, 10 फेब्रुवारी 09.

सोमवार दिनांक 9/2/2009 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत सेवाकार्य पुढीलप्रमाणे.
  1. जवळच्या खेडयांमध्ये जुने ते सोने वाटप
  2. शर्टस, पँटस, सलवार, खमीज,साडया, गोधडी, स्वेटर्स, घरात उपयोगी भांडी
    आरोग्याची काळजी व त्यासाठी लागणा-या वस्तुंचे वाटप
  3. कॅपच्या जागेवरच रात्रीच्या जेवणानंतर सत्संगाचा कार्यक्रम.

मंगळवार दिनांक 10/2/2009 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सेवाकार्य पुढीलप्रमाणे.

  1. मेडीकल कँप
  2. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व शाळेचे आणि खेळाचे वस्तुवाटप औषधांचे वाटप
  3. अन्नपुर्णा महाप्रसाद

एकूण कार्यकर्ते - कोल्हापूरचे स्थानिक – 1576 आणि मुंबईचे 450
डॉक्टर्स - 138
पॅरामेडिकल स्टाफ - 108
एकूण खेडयांचा सहभाग - 56
एकूण कुटुंबे - 4744 पैकी पुरुष - 10753 आणि स्त्रीया – 11,439
एकूण गांवकरी – 22,192
शाळांची संख्या – 113
एकूण विद्यार्थी – (इयत्ता 1ली ते 9 वी ) 8,349

रविवारी दि. 8/2/09 रोजी सकाळी 6.30 वाजता प्रसाद ट्रॅव्हल्स टीळक ब्रीज जवळ हिंदू कॉलनी दादर पूर्व येथून बसेस सुटणार आहेत. ( एकूण 11 बसेस आणि 450 कार्यकर्ते मुंबईहून सेवेसाठी जाणार आहेत.) सकाळी 1ला थांबा खोपोली येथे असून तेथे सकाळचा नाश्ता चहासाठी बस थांबणार आहे. नंतर 2रा थांबा सातारा येथे आहे. येथे लँडमार्क मंगल कार्यालय येथे असून तेथेच दुपारचे जेवण होणार आहे. नंतर कोल्हापूर येथे एल.बी. लॉन इकडे संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर तेथे रहाण्याची सोय केलेली आहे.

पहिला दिवस, ९ फेब्रुवारी २००९

दिनांक 9/2/09 च्या सकाळी सर्व कार्यकर्ते पहाटेपासूनच शिबीर स्थळी जाण्यासाठी उत्सुक होतेच व सर्वजण तयार होऊन मार्गस्थ झाले देखील. शिबीरस्थळी पोहचल्यानंतर असे दिसून आले की तिथला निसर्गरम्य परिसर आणि आतिशय दूर्गम असे ठिकाण पाहून प.पू.बापुंच्या हया अवाढव्य कार्याची महानता, भव्यता डोळयापुढून पुढे सरकू लागली. तीथल्या प्रत्येक कृतीतून जाणवणारे प्रेमळ बापू. तेथील बापूभक्तांना प.पू. बापुंच्या पादूका व उदीचा अलभ्य लाभ, आणि त्यातला परम योग म्हणजे तीथे झालेले प.पू.सूचितदादांचे व नंदामाईचे आगमन आणि तेथील सर्वांनाच त्यांचा मनसोक्त दर्शनाचा झालेले लाभ.

त्यानंतर सदगुरुंची प्रार्थना झाली. व सर्व कार्यकर्ते आपापल्या ग्रुपमध्ये जाऊन उभे राहीले.

जवळच्या खेडयांमध्ये जुने ते सोने वाटप
(शर्टस, पँटस, सलवार, खमीज,साडया, गोधडी, स्वेटर्स, घरात उपयोगी भांडी)

त्यानंतर जसजशी अनाउंसमेंट होत होती तसतसे प्रत्येक ग्रुपची नावं व त्यांच्याबरोबरचा जुने ते सोने वाटपाच्या वस्तुंचा टेंपो व गावांची नावे वाचली जात होती व ते सर्व आपापल्या कामासाठी बाहेर पडत होती. जुने ते सोने वाटपाची व्यवस्था इतकी चोख बजावलेली होती की प्रत्येक देण्याचे पॅकेट हे त्या त्या गावातील गावक-यांच्या नावाने तयार होते व बरोबर एक नावाची यादी देखील आणलेली होती. एक अनोखी वेगळी अशी ही सेवा होती. त्या त्या गावात गेलो की तीथली माणसे सर्वजण एकत्र येऊन बसलेली असायची. ती लगेचच गजर सुरु करायची. खुप आनंद वाटत होता. ते उत्स्फुर्त गजर असे होते.

  1. तुला खंद्यावर घेईन । तुला पालखीत ठेवीन ।।
    अनिरुध्दा मी मुंबईला । पायी चालत येईन ।।
    तुझ्या मुंबई नगरात । माझा विठू मी पाहीन ।।
    पायी चालत येईन । अनिरुध्दाला पाहीन ।।
    अनिरुध्दाला पाहीन । माझं दुःख मी विसरीन ।
    पायी चालत येईन । अनिरुध्दाला पाहीन ।।
  2. युगे अठठाविस उभा । विठू विटेवरी ।।
    भक्तांसाठी आला माझा । अनिरुध्द हरि ।।
  3. अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
    बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
    त्या तुळशीला घालूनी पाणी ।
    पाणी घालुनी गेलीया जनी ।।
    अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
    बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
    त्या तुळशीला लावूनी कुंकू ।
    कुंकू लावूनी गेलीया सखू ।।
    अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
    बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
    हया तुळशीला लाउनी बूक्का ।
    बुक्का लावूनी गेलाय तूका ।।
    अंगणी माझ्या तुळस । लावली हिरवीगार ग ।। (2 वेळा)
    बघाया जाऊ माझ्या । बापूंचा संसार ग ।।
  4. असा कसा बाई माझा भोळा अनिरुध्द ।
    भक्तांसाठी आलाबाई खेडेगावात ।।
    बुरंबाळ गाव कुणाला नसे ठावूक ।
    बापुंमुळे भक्तांना या झाले ठावूक ।।
  5. हातात धनूष्य बाण बाई मला लागले बापूंचे ध्यान ।।
    गुरुमहाराजांनी नवलाई केली सूचित दादांनी बागेला नेली ।
    हया बागेमंदी फूले कशाची ।
    त्या बागेमंदी फूले चाफयाची ।
    हातात धनूष्य बाण बाई मला लागले बापुचे ध्यान ।।
    गुरुमहाराजांनी नवलाई केली ।
    समिरदादाने बागेला नेली ।
    त्या बागेमंदी फूले कशाची ।
    त्या बागेमंदी फूले गुलाबाची ।
    हातात धनुष्य बाण बाई मला लागले बापुचे ध्यान ।।
  6. सुपात जोंधळं घोळीते 2 वेळा
    जात्यावर दळण दळीते 2 वेळा
    अंगणी तुळस पुजीते 2 वेळा
    माझ्या बापूंचे चरण धरीते 2 वेळा
  7. आई ग नंदामाता तुझा सोन्याचा ग झूबा ।
    तुझ्या ग द र्शनाला राजा मुंबईचा उभा ।।
    मुंबईचा राजा माझा आला ग भक्तांसंग ।
    आला ग भक्तांसंग त्याला घ्यावं पदरात आई ग घ्याव पदरातं ।।
    मुंबईचा राजा माझा आला ग पालखीतं ।
    आला ग पालखीतं आई ग घ्याव पदारातं ।।
    मुंबईचा राजा माझा आला ग दिंडीतूनं ।
    आला ग दिंडीतून त्याला घ्यावं पदरातं ।।

अशा हया सर्व भाविक भक्तांकडून हे गजर ऐकून तर आम्ही फारच सुखावून गेलो होतो. त्यानंतर आम्ही जवळजवळ सर्व कार्यकर्ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत पुन्हा शिबीर स्थळी पोहोचलो होतो. ते तिथे आमझ्यासाठी त्यावेळी सुध्दा जेवण तयार होतेच. आम्हा सर्व भक्तांना ही माहेरची उबच मिळत होती.

कँपच्या जागेवरच रात्रीच्या जेवणानंतर सत्संगाचा कार्यक्रम

संध्याकाळी ठिक 7.00 वाजता प.पू.नंदामाई आणि सूचितदादांच्या सहवासात सत्संग सुरु झाला त्यावेळी त्या गावकरी भक्तांच्या आनंदाला उधाणच आले होते. सर्वत्र प.पू बापुंच्या जयजयकार आणि भक्तीरसाने वातावरण दूमदूमून गेले होते. तिथल्या धूळीने तर आकाशात सुध्दा भक्तीचा गंध पसरला होता। । त्यानंतर संध्याकाळी, पुन्हा दुस-यादिवशी लवकरात लवकर शिबीर स्थळी पोहोचावयाचे असल्याने आम्ही सर्व कार्यकर्ते ​विश्रातीच्या ठिकाणी गेलो.

दूसरा दिवस, १० फेब्रुवारी २००९

दूस-या दिवशी ठिक आठ वाजता आम्ही पुन्हा शिबीर स्थळी. मात्र आजचा कामाचा ढंग खूपच वेगळा ​दिसत होता. सर्व कार्यकर्ते आपापली बॅचेस लाऊन सेवेसाठी हजर झाली होती. प्रत्येक सेवेचा कौंटर वेगळा होता. सर्व डॉक्टर्स देखील अगदी वेळेत हजर झाली होती. वास्तविक आज त्यांचेच काम जास्त असणार होते.


दि. 10/2/09 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सेवाकार्य पूढीलप्रमाणे चालू रहाणार होते.

दिंडी
सकाळपासूनच सर्व भक्तगण दिंडीमधून बापूरायाला गजर गात साद घालत होते, नाचत होते, आणि सर्व शिबीर स्थळ भक्तीमय वातावरणात उल्हसित झाले होते.

आरोग्याची काळजी व त्यासाठी लागणा-या वस्तुंचे वाटप

  1. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व शाळेचे आणि खेळाचे वस्तुवाटप हयामध्ये 6 रंगांचे व 2 प्रकारचे विद्यार्थांचे युनिफॉम्स मुलांसाठी 4417 X 2 वाटले जातील. तसेच मुलींना 3551 X 2 प्रत्येकी वाटले जातील. तसेच 8349 स्लीपर्स, आणि 8349 कॅप्स वाटले जातील.
  2. खेळाच्या वस्तु व खेळ – हयामध्ये 220 फूटबॉल, 220 हँडबॉल , रिंग्ज 440 दोरीच्या उडया 660 इतके वाटले जाईल.
  3. औषधांचे वाटप: उवांचे औषध, कंगवे, फण्या, 9500 ,साबण – 9500, दात घासण्याची पावडर 9500 पॅकेटस , भांडी घासण्याची पावडर 9500 किलो, पाणी शुध्दीकरण औषध – 100 मिलीलीटर्सच्या 4744 बाटल्या , खरजेचे औषध - 100 मिलीलीटर्सच्या 4744 बाटल्या.
  4. अन्नपुर्णा महाप्रसाद (मिक्स भाजी, मसालेभात, लोणचे, आमटी,शिरा).
आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच आवश्यक असलेले अन्नपूर्णा महाप्रसाद हाही कौटर अतिशय महत्वाचा होता त्यामुळे तेथेही भरपूर कार्यकर्ते सेवेसाठी तत्पर होती. सकाळी साधारणपणे 10.00 वाजल्यापासून जेवणाच्या पंगती वाढल्या जात होत्या. त्या सुमारे दुपारी 4.00 वाजेपर्यंत चालू होत्या आणि सुमारे 65000 इतके भक्तगण प्रसादाचा लाभ घेवून आनंदाने परतली.

तेथील भक्तांचे अनुभव
  1. नावे नोंदणीच्या ठिकाणी एक भक्त म्हणाला “आम्ही सरकारी अनुदान/मदत मिळते तेथेही जातो. तीथे सुध्दा लोकांची झुंबड उडते. इथे इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी असून देखील तुम्ही कसे नियंत्रण मिळवतात ? तिकडे तर दंडूका मारुन नियंत्रण मिळवतात.“ आम्ही म्हणालो करणारा तो केवळ एक बापूच आहे. कारण एवढया तीन दिवस पूर्ण भरघोस कार्यक्रमात कुठेही गडबड गोंधळ आढळून आलाच नाही.
  2. काही भक्तगण म्हणाले की आम्ही दिवाळी साजरी करत नाही हे शिबीर म्हणजेच आमची दिवाळी असते. आम्हाला मात्र हे ऐकून आमच्या येथील प्रत्येक सणाला प.पू. बापुंच्या कार्यक्रमांची आठवण सुखाऊन गेली.
  3. काही तेथील रहिवाशी भक्तगण म्हणाले की आमच्या कडे बापू येण्यापूर्वी आमच्यात खूप भांडणं होत असत. परंतु आता एवढा फरक झाला आहे की आम्ही सर्वजण आमच्या सर्वांची काळजी घेतो आणि एकमेकांना मदतही करतो. आम्ही सांघीक उपासना करतो.
  4. तसेच आमच्या इथे देवदासी प्रथा चालू होती तीही आता पूर्णपणे बंद झाली आहे.
  5. जुने ते सोने वाटप करतेवेळी एका बाईंना काहीही मिळाले नाही तर आम्हाला वाटले की हया बाई आता काहीतरी तक्रार करणार परंतु त्या बाईंचे उत्तर अगदीच निराळे मिळाले. त्या बाई म्हणाल्या की आता नाही मिळाले तर काय झाले. आमचा बापू पुढच्या वर्षी नक्की देईल.

त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता कँप संपल्यानंतर आता सर्वांना घरी जाण्याची गलेली घाई. सर्व भक्त आवराआवर करु लागली तेंव्हा आमच्या प.पू. नंदाई गुरुकुलाच्या बाहेर येऊन सर्वांना उद्देशन म्हणाल्या की "माझ्या बाळां नो तुम्ही खूप दमलात ना. खुप छान कार्यक्रम झाला. तुम्हाला काही बरे वाटत नसले तर बाप्पा तुमची काळजी घेणारच आहे. त्यांचे स्मरण करा. तुमचे हे सेवेचे गाठोडे घेऊन मी देवाकडे जाणा आहे". हे ऐकून मात्र सर्व कार्यकत्यांचे हदय आणि मन हेलावले आणि डोळयांच्या कडा पाणावल्या.

त्यांनतर सर्वांच्या परतीच्या प्रवासाची सोय श्री. वैभवसिंह व श्री. अजीतसिंह बघत होते. ते सांगतील त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते लाईनीने सांगतील त्या बसमधून बाहेर पडत होते.

असा हा आमचा ​​​​शिबीर कार्यक्रम सर्व आठवणी साठवून समाप्त झाला. पण पुढल्या वर्षीच्या शिबीराची वाट पाहात... सरते शेवटी आद्य पिपांच्या 2 ओळी आठवतात –

नित्य घडो तुझी सेवा । बापू हाचि माझा मावा ।।
सर्व तुच माझा ठेवा । बापू हाचि माझा कावा ।।
।।हरि ॐ ।।